अहमदनगर मधील खवय्यांना हलकाफुलका असा वाटणारा आणि चवीलाही तितकाच स्वादिष्ट वाटणारा पापड भाजी हा पदार्थ सर्वांना खूप आवडतो , पापड भाजी म्हटलं की नेमकं काय असे अनेकांना वाटतं असते. आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पापड खातो, मात्र पापड भाजी असा ही पदार्थ असू शकतो का?
तर हो ,नगरच्या कापड बाजार पेठेत चवीला फक्कड असणारी पापड भाजी मिळते, कारण बऱ्याचदा आपण पापड हे उडदाचे मुगाचे किंवा आणखी वेगळ्या प्रकारचे पाहत असतो आणि त्या पापड्यांसोबत भाजी हे कॉम्बिनेशन थोडंसं वेगळं वाटतं अहमदनगर मध्ये मिळणारी ही पापड भाजी एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने बनवली जाते, पापड भाऊजी हा पदार्थ एक्सीडेंटली बनलेला आहे .
समोसाच्या उरलेल्या पिठाच्या बारीक काप करून तळले आणि सोबत बटाटा भाजी दिली. हे कॉम्बिनेशन ग्राहकांना आवडले, या नंतर मग कडक पापड तयार झाला ,वर गरमागरम भाजी या चवीला कुठे तोडच नाही. हा पापड कसा तयार होतो. अनेकांना हा पापड खूप आवडतो , यात मैदा, रवा, तेल, ओवा, जिरा आदी पदार्थांचे मिश्रण करून त्यापासून पापड लाटला जातो. हा पापड तळल्यानंतर त्याला चांगला कडकपणा येतो. त्यानंतर त्यावर बटाटा, वटाणा, मूगडाळ, हरभरा डाळ, पालक, कोथिंबीर, टोमॅटो आदींपासून तयार केलेली भाजी टाकण्यात येते. त्यावर चिंचेचे पाणी, कांदा व मिरची टाकली जाते. हातात कडक पापड व त्यावर गरमागरम भाजी आल्यावर पापडाचा तुकडा तोडून तो भाजीत बुडवून खाताना नेहमीचा पापड खातानाचा कुरमकुरम आवाज व समवेत आंबट-तिखट भाजीची लज्जतदार चव चिभेला तृप्तीची अनुभूती देते.
साधारणपणे १९७० च्या दरम्यान नगरमध्ये पापड भाजी मिळण्यास सुरुवात झाली. त्या काळी या पापड भाजीची किंमत १५ पैसे होती,’ असे पापड भाजी विक्रीचा तीन पिढ्यांपासून व्यवसाय करणाऱ्या खंडेलवाल परिवारातील आनंद खंडेलवाल सांगतात. ‘नगरच्या बाजारपेठेत खरेदीसाठी आल्यानंतर नागरिक आवर्जून पापड भाजी खाण्यास येतात. आता तर नगर जिल्ह्यासह पुणे, मुंबई, औरंगाबाद अशा राज्याच्या विविध भागातील नागरिक आमच्याकडे पापड भाजी खाण्यास येत असतात. सुरुवातीला १५ पैशांना मिळणारी पापड भाजी आता ३५ रुपयांना मिळते.
या पापड भाजीला खंडेलवाल यांच्या आईचा हात लागतो आपण म्हणतो ना आईच्या हातला चव च काही वेगळी असते, हे पापड लाटणे साठी आई मदत करते , आमची पापड भाजी सर्वांना आवडते आनंद होतो अस त्या आवर्जून सांगतात.










